Saturday, 20 August 2016

खेळ



📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊*
..................आयोजित...............

*🗽  साहित्य दरबार वैचारिक लेखमाला  🗽*
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- (आठरा ) 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 21/08/2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★★★★★★★★

*विषय - शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्त्व*
†††††††††††††††††† †††††††††
💥 संकल्पना :- ना सा येवतीकर
**************************
💥 संयोजक - आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक - किशोर झोटे औरंगाबाद 
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""'''""""''''''''''''''''''''''''''"''''''
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवार
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _23 ऑगष्ट 2016_ रोजी सायंकाळी 9:00 वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱9823922702
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~
📕 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला भाग १८📕
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷 शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व  🌷
⚽🏌⛷🏂🏐🏹🏏🏑⚾🏸
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
       मुलांची मानसीक भावनीक वैचारिक अशा गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांची गरज भासते आजची पिढी हि आळशी ऐतखाऊ बनत चालली आहे कारण लहान वयापासुन दिशा देण्याचे जे काम आहे तिथे काहीतरी चुकतेय अस मला वाटतेय मुलांनी शालेय जीवनात कशाला महत्व द्यावे याला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत आज आपण पहातो तासन तास मुले टि व्ही समोरुन उठत नाहीत मोबाईल फेसबुक हॉट्सअप याला तर वयाचे बंधनच राहिले नाही यामुळे दिशाहीन पिढी निर्मान होत आहे  याचा जरा गाभिर्याने विचार करायची गरज आहे 
     पुर्वी कशी मुले वेगवेगळ्या खेळात रमायची विटिदांडू सुरपारंब्या लगोर लपंडाव लपाछपी असे अनेक पारंपारिक खेळ गल्लीबोळातुन चालायचे शालेय जीवनात खेळाला खुप महत्व आहे या बालवयात मुलांना योग्य व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाले तर मुलांना खेळाची आवड निर्मान होईल परंतु आपल्या शिक्षण पध्दतीमध्ये खेळाला दुय्यम स्थान आहे कुठल्याही शाळेत तज्ञ क्रिडाशिक्षक उपलब्ध नाहित खेळाचे जे नियम असतात ते मुलांपर्यंत जातच नाहीत परिणामी खेळ म्हणजे फक्त मुलांनी मैदानावर हव्या तशा उड्या मारायच्या असा होतोय हि वस्तुस्थिती आहे आणी याचा परिणाम बालकावर होतो
    मुलांना शालेय अभ्यासक्रमात खेळाचे तंत्रशुध्द शिक्षण मिळायला पाहिजे सचिन तेंडुलकरची बँटिंग पहायला मुलांना खुप आवडते पण सचिन तेंडुलकर निर्मान व्हावेत व त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी असावी अश्या पिढ्या निर्मान होण्याची आज गरज आहे  सध्या ऑलिम्पिक सामने रिओमध्ये सुरु आहेत त्यामध्ये इतर देशाच्या तुलनेत भारत मागे आहे आपल्या देशाची मान उंचावण्याचे काम खेळाडु सिंधू व साक्षी या विरांगणांनी केले आहे हि एक अभिमानाची गोष्ट आहे हिच प्रेरणा घेवून खेळाला प्राधान्य क्रम देवून शाळास्तरावर खेळ शिकविले जावेत त्यासाठी तज्ञ क्रिडाशिक्षक उपलब्ध करुन द्यावेत मुलांच्या खेळाच्या स्पर्धा व्हाव्यात आणी बालवयापासुन मुलांमध्ये खेळाची आवड निर्मान होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा खेळामध्ये मुली कुठेच कमी नाहीत हे भारतीय खेळाडु साक्षी हिने कुस्ती मध्ये पदक मिळवुन दाखवुन दिले आहे
       खरतर खेळाला फार पुर्वीपासुन महत्व आहे रामायण महाभारतातही त्याचे दाखले मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांना मॉ जिजाऊ यांनी खेळाचे महत्व पटवुन दिले त्यामुळे त्यामुळे त्यानाही त्याचा फायदा झाला खेळामुळे संघटन वाढते हे त्यंनी महाराष्ट्राला दाखवुन दिले
      यासाठी आता शासन दरबारी खेळाचे महत्व वाढवण्याचे प्रयत्न व्हावेत प्राथमिक शाळेपासुन प्रत्येक शाळेत पूर्णवेळ क्रिडाशिक्षक नेमावा इतर विषया प्रमाने नव्हे त्याहीपेक्षा जास्त महत्व खेळालाा द्यावे फक्त कागदोपत्री नव्हे प्रत्यक्ष कृती हवी  आता शाळेत विनावेतनावर कला कार्यानुभव व क्रिडाशिक्षक भरलेत पण ते विनावेतन काम कसे करतील
          खेळामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहील मुले सुदृढ बनतील व भारताचे भावी नागरिक चांगले घडतील असा मला विश्वास आहे
               खेडकर सुभद्रा बीड
              अनु क्रं(२०) 
              मो नं (९४०३५९३७६४)
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~
*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*

रिओ ऑलिम्पिक मध्ये भारत पदक तालिकेत आपले खाते उघडते किंवा नाही याबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात शंका निर्माण होत असताना साक्षी मलिकने कुस्तीत कास्य पदक जिंकून 125 कोटी भारतीयांची शान राखली तर बैडमिंटनपटु पी व्ही सिंधुने रौप्य पदक मिळवित सर्व भारतीयांची मान उंचावली. तसे पाहिले तर इतर देशाच्या तुलनेत आपली एवढी मोठी लोकसंख्या असून सुध्दा पदक मिळण्याच्या बाबतीत खुपच मागे का आहे ? यावर विचार करणे आवश्यक आहे. खरे तर खेळाची सुरुवात प्राथमिक शाळेपासून व्ह्ययला पाहिजे.
उत्तम आरोग्य असेल तर त्याचे डोके सुध्दा उत्तम असते अश्या अर्थाची एक म्हण वाचण्यात येते. त्याचा अर्थ शालेय जीवनापासून लक्षात घ्यायला हवे. कारण प्राथमिक शिक्षणाची सुरुवात शाळेत होते आणि याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. मुलाचा शारीरिक,भावनिक विकास होण्यासाठी खेळ आवश्यक आहे. मुले खेळण्यात जास्त वेळ घालू लागली की पालकाची ओरड ठरलेली असते की आत्ता किती वेळ खेळणार ? चल बस अभ्यासाला. ही नेहमीची पालक वर्गाची ओरड प्रत्येक घरात दिसून येते. यास पालकाना दोष देऊन चालणार नाही कारण सध्या परिस्थितीच आहे तशी खेळापेक्षा अभ्यासाला महत्व जास्त देण्यात येते.
संगणकच्या युगात काही चांगले घडत आहे तर काही वाईट सुध्दा घडत असताना दिसत आहेत. मोबाईल नावाच्या जादुई खेळणीने मुलांचे सर्वच खेळ हिरावुन घेतले आहे असे वाटते. पूर्वी ग्रामीण भागातील शाळा आणि रिकामी जागा मुलांच्या खेळाने भरून जात असत. शहरात खेळाची मैदाने सायंकाळी आणि रविवारच्या दिवशी मुलांनी फुलून जायचे. पण आज हे चित्र फार कमी पाहायला मिळत आहे. कारण आज मुले घरात बसल्या ठिकाणी मोबाईल वर सर्व खेळ खेळत आहेत. मैदानी खेळ कमी झाले. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यांचा मेंदू काम करेनासे झाले आहे. शरीर जड होत आहे. मुलामध्ये चैतन्य नावाची वस्तु सापडत नाही. या सर्व बाबीवार एकच उपाय ते म्हणजे शारीरिक खेळ. मुलांचा अभ्यास तेंव्हाच चांगला होऊ शकतो ज्यावेळी त्यांचे मन प्रसन्न असेल आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांना मैदानावर खेळण्यास नेणे गरजेचे आहे. मैदानावर फिरणे असो खेळ खेळणे असो वा इतर काही करणे यामुळे मुलांना ताजी हवा मिळते जे की शरीरला आवश्यक आहे आणि मन प्रफुल्लित होते. म्हणून मुलांना नुसते अभ्यास करा असे म्हटल्याने मुलांचा अभ्यास नीट होणार नाही. ते आपल्या धाकामुळे वाचन लेखन अभ्यास करतील पण त्यांच्या लक्षात राहणार नाही, हे ही तेवढेच सत्य आहे त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी थोडा तरी वेळ खेळ खेळणे आवश्यक आहे. पण आज आपल्या मुलांची सकाळ आणि सायंकाळची वेळ ही शिकवणीमध्ये जात आहे. शाळेत सुध्दा खेळाचा एक तास असतो मात्र शाळेत किती व कोणकोणते खेळ शिकवल्या जातात हा एक संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो. त्यास शिक्षक दोषी आहेत असे नाही कारण तेथे खेळाच्या शिक्षकाची कमतरता भासते. आज कित्येक शाळेत खेळाचे शिक्षकच नाहीत तर काही शाळेत खेळाचे मैदान उपलब्ध नाही तर मुले काय खेळतील आणि कुठे खेळतील ? कधी कधी मुले ज्यांच्या शाळेत मैदान आहे तेथे खेळताना दिसून येतात त्यांना कोणाचे मार्गदर्शन नसते, ना कोणाचा कानमंत्र ते आपले उगीच खेळ खेळत असतात. परंतु त्यांना चांगला गुरु मिळाला तर अनेक स्तरावर आपले नाव व कीर्ती मिळवू शकतात. शाळेत शिकलेल्या खेळाचा आयुष्यात फायदा होतो. शालेय जीवन संपल्या वर आपले कोणत्याच खेळाकडे लक्ष जात नाही कारण त्या खेळाविषयी जी रूची शाळेत तयार व्ह्ययला पाहिजे ते होत नाही. शाळेतील खेळ पावसाळी आणि हिवाळी खेळापूरती औपचारिकपणे पूर्ण केल्या जाऊ नये. 
शालेय अभ्यासक्रमात खेळाचा तास हा शेवटचा असतो ज्यात सहसा काहीच होत नाही कारण मुलांना घरी जाण्याचे वेध लागलेले असते. दुपारची पूर्ण वेळ खेळासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. शाळेतून विविध प्रकारच्या खेळाची तयारी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाने या बाबिकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निदान सहाव्या वर्गापासुन तरी खेळाच्या शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुले योग्य दिशेत मोकळेपणाने खेळ खेळतील. एखाद्या खेळात निपुण व्हायाचे असेल तर विषय शिक्षकच फक्त त्यास न्याय देऊ शकतो. तीन वर्षापूर्वी कला , कार्यानुभव आणि क्रीडा विषय शिकविण्यासाठी अंशकालीन निदेशकची नेमणूक करण्यात आली होती. तेंव्हा मुले त्या विषयात अभ्यास करताना आनंदात होती. पण त्यांचा आनंद दीर्घकाळ टिकू शकले नाही. कारण पुढे त्यांची नेमणूक रखडली. प्रत्येक सहावी ते दहावीच्या वर्गासाठी क्रीडा शिक्षक असेल तर भविष्यात साक्षी आणि सिंधू मोठ्या प्रमाणावर तयार होतील. अशी आशा करण्यास हरकत नाही. कोणत्याच सोई सुविधा उपलब्ध नसेल तर आपली मुले स्पर्धेत कशी राहतील याचा विचार करणे आवश्यक नाही काय ?
जर आत्तापर्यन्तच्या ऑलिम्पिक चा इतिहास पाहिले असता भारत देश सन 1900 पासून यात सहभाग घेत आहे. आजपर्यन्त भारताने 9 सुवर्ण चार रौप्य आणि 12 कास्य असे एकूण 25 पदक गेल्या 116 वर्षात मिळविले आहे आणि गेल्या 20 वर्षाचा मगोवा घेतल्यास असे लक्षात येते की सन 1996 पासून भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कास्य पदकाची कमाई केली याचाच अर्थ गेल्या वीस वर्षपासुन भारताचा ऑलिम्पिक मधील सहभाग वाढला असून जास्तीत जास्त खेळ खेळून पदक मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत म्हणण्यास हरकत नाही. मात्र अजूनही मुलांना या खेळाच्या बाबतीत अधिक जागृत करून त्यांना खेळाकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. शाळा स्तरापासून ते देश स्तरापर्यन्त विविध स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूना प्रोत्साहन मिळवून देणे याची आत्ता खरी गरज आहे.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद

  09423625769
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~
[8/21, 1:24 PM] ‪+91 96574 35292‬
शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व 
               
            "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो जो ते घेईल तो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." 
          - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
   खरोखरच अन्न,वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. "चारित्र्याचा विकास म्हणजे शिक्षण" चारित्र्याचा विकास करायचा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे,आणि हा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शालेय अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळाला महत्व दिले पाहिजे. ही गरज ओळखूनच शासनाने शालेय अभ्यासक्रमात कला, कार्यानुभव आणि शा.शि. याविषयांचा समावेश केलेला आहे. 
           रीओ ऑलिंपिकच्या पदतालिकेमधील भारताचे स्थान पाहून शरमेने मान खाली झुकते. जर शालेय अभ्यासक्रमात खेळाचा समावेश आहे मग आपण मागे का? आपल्या कडे गुणवत्ता नाही का? खाशाबा जाधव, पी टी उषा, अभिनव बिंद्रा, मेरी कोम, साक्षी, सिंधू अश्या आँलिंपिक पदक विजेत्यांचा विचार करता अभिमानाने सांगावस वाटत की गुणवत्तेमध्ये भारत कुठेच कमी नाही. मग अडचण कुठे आहे?
             अडचण आहे यशस्वी अंमलबजावणीची, भ्रष्टाचाराची, कुचकामी प्रशासन यंत्रणेची. शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व विषयांना सारखाच न्याय दिला पाहिजे. त्यासाठी प्राथमिक 
शाळेपासूनच खेळाचा शिक्षक असला पाहिजे जो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचेही उदबोधन करेल. शासन दरबारी ही खेळासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजे व योजना कागदोपत्रीच न राबवता त्यांची यशस्वी अंमलबजावणी झाली पाहिजे.
        शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व जाणून त्यानुसार कार्यवाही व यशस्वी अंमलबजावणी केली तर निश्चितच आँलिंपिक मधील भारताचे स्थान सर्वात वरचे असेल.

              शैलजा ओव्हाळ /चिलवंत 
                           बीड 
                          @ 73 
                 स्पर्धेसाठी
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~

[8/21, 2:37 PM] Yogini Hyd
शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व 

◯‍◯‍◯‍◯‍◯ स्पर्धेसाठी◯‍◯‍◯‍◯‍◯

जिवनात अनेक प्रकारच्या समस्यांनी मानव सतत घेरलेला आहे . खेळ खेळण्याने समस्या आणि तणाव थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होते . 

शिक्षणाने मनुष्याचा मानसिक विकास होतो . पण मानसिक विकासा बरोबरच शारीरिक 
विकासही आवश्यक आहे. व्यायाम आणि खेळ यामुळे सर्वांगिण विकास होतो . तसेच शरीराच्या विभिन्न अंगाचे संचालन व्यवस्थितपणे होते . म्हणुनच जगभरात खेळांना खुप महत्व दिले जाते. 

शाळेत खेळांना महत्व आहेच . शाळेत वार्षिक खेळ महोत्सव होत असतात . विभिन्न खेळांचे प्राथमिक शिक्षण शाळेतच दिले जाते . खेळांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, मुले उत्साही बनतात. शालेय खेळांमधिल जित किंवा हार मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव शिकवतात. हरण्यामुळे आपल्यातील कमतरता शोधून नविन उमेदीने पुढच्या वेळी जिंकण्याचा प्रयत्न करतात . आणि जिंकण्यामुळे मुलांमध्ये नव्या उत्साहाचा संचार होतो . 

खेळ स्पर्धांमध्ये ऑलंपिक स्पर्धा जी दर चार वर्षी होते  अत्यंत मोठी मानली जाते . 
तसेच क्रिकेट , बुद्धीबळ, सॉकर, हॉकी अशा अनेक खेळ स्पर्धा जगभरात होत असतात. 
खेळाडूंना खूप सन्मान दिला जातो . सरकारी नौकरीत त्यांना प्राधान्य दिले जाते . समाजात आदर असतो .  

मग खेळाचे इतके महत्व मानव जिवनात असताना जागतिक स्तरावर भारत देशाची प्रतिमा  आणखी उंच पोचवण्यास आपण सुद्धा प्रयत्न करूया. आणि खेळाडूंना भरभरून  पाठिंबा देऊया. 

योगिनी चॅटर्जी #52 
🏅🏅🏅🏅🏅
🏅~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~🏅
[8/21, 5:04 PM] 
📚साहित्य दर्पण व्दारा आयोजित📚
***********************
    साहित्य दरबार
वैचारिक लेखमाला स्पर्धा
***********************
विषय---शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व
***********************
भाग----अठरावा
दिनांक --21-8-2016
****************-******
आपण सारे खेळूया !
गमंत जमंत खेळूया !
रबरी चेंडू झेलूया ! टप टप टप
एक., दोन, तीन, चार मोजुया !
या चार ओळी जेव्हा आपण इ-1 ली च्या वर्गात म्हणतो तेव्हा त्या मुलांचे चेहरे तपासा त्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वहात असतो..म्हणजेच खेळ ही गोष्ट लहान मुलांच्या अत्यंत  आवडीची आहे कारण शाळेत येण्या पुर्वीचे त्यांचे विश्व हे आई, घर , खेळ एवढेच असते.
खेळणे ही एक सहज प्रवृत्ती आहे.आणि या सहज प्रवृत्तीचा आपणाला अध्यापनात उपयोग करुन घ्यायचा आहे आणि म्हणुण शासनाने अभ्यासक्रमात  शा. शि.हा विषय अंतर्भूत केला  आहे.खेळामुळे आनंददायी,  क्रियाशिल,व मनोरंजनातुन शिक्षण देता येते.शिक्षणातुन विद्यार्थ्यांचा सार्वांगिण विकास होतो.सार्वांगिण विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक , इ. शरीर, मन,आणि बुद्धी .शरीर चांगले असेल तर बुद्धी चांगली विकसित होऊन मानसिक विकास होतो.वर्गातला शिक्षक मुलांच्या बुद्धिमत्तेला आणि कलागुणांना चालना देतो, तर मैदानावरचा शिक्षक
मुलांच व्यक्तीमत्व घडवतो व  त्यांच्यात खिलाडू वृत्ती , आणि स्पर्धात्मकभाव जागविण्याच महान कार्य करीत असतो.म्हणुण शालेय अभ्यासक्रमात खेळाला अनन्य साधारण महत्व आहे
           उद्याचा भारत आजच्या शाळेतुन घडत आहे
विद्यार्थ्यांचा सार्वांगिण विकास साधत असतांना भूत काळाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याची जाण फक्त शिक्षकालाच असु शकते.शाळा हा घटक समाज व राष्ट्रांच्या प्रगतीच्या दृष्टीने  अतिशय महत्वाचा घटक आहे, प्रगतीची बीजे शाळेत पेरली जातात, आणि त्याचा उपयोग समाज उन्नती साठी होतो.आणि म्हणुण निकोप व आरोग्यदायी पिढी घडवण्याचे काम शासनाने शिक्षकांवर सोपवले आहे.शा.शि. हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला खरा पण त्यासाठी लागणारा तज्ञ क्रिडाशिक्षक प्रत्येक  शाळेला देणे गरजेचे असताना  दिला नाही.मग शाळेतलाच शिक्षक शेवटचा तास खेळाचा घेतात .कोणाचीच मानसिकता नसते मुलांना नुसते खेळा म्हणायचे काय खेळणार मुले कबड्डी किंवा खो-खो यांचे नियम वर्गात सांगुन उपयोग होणार नाही त्यासाठी मैदानावर जाऊन ,मैदान आखुन प्रत्यक्षखेळुन नियम समजावता येतात.परंतु कुचकामी नियोजन, कागदोपत्री अहवालआणि A,C त बसुन देखरेख काल्यावर जागतीक किर्तीचे खेळाडू कसे तयार होणार ? 
त्यामुळे प्राथमिक शिक्षणात खेळाला जागतीक दर्जा देणे अपेक्षित आहे ना प्रत्येक शाळेला एक क्रिडाशिक्षक, खेळाचे साहित्य(दर्जेदार) मैदान द्या उपलब्ध करुन आणि पहा माझा शिक्षक बांधव देशाला किती सुवर्ण पदक मिळवून देतो ते !
आज आपण पहातो आँलिंपिंक मध्ये भारताची पिछेहाट होते परंतु त्यासाठी खेळाडूचा दोष नाही तर आपल्या देशाच नियोजन परिणामकारक नाही सुविधांचा अभाव आहे.म्हणुण खेळासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा पुरवाव्या जेणे करुन क्रिडाशिक्षणाचा पाया प्राथमिक शाळेत पक्का होईल.
             पुर्वीच्या काळी आपण पहातो सर्व निसर्ग सानिध्यात खेळ खेळले जायचे उदा. विटीदांडू, लगोरी,सुरपारंब्या,नेमबाजी, पोहणे इ.या खेळामधुन अनेक फायदे होत ,ह्दयाचा दमदारपणा, स्नायुची ताकद, लवचिकता , शरीरधारणा.
शिवाजी महाराज, श्रीकृष्ण, अर्जुन हे सर्व शारीरिक चापल्यतेचे खेळ खेळले. आज आपण पहातो शाळेतुन घरी आले कि T.V,समोरुन मुले उठत नाहीत मैदानी खेळ  खेळत नाहीत त्यामुळे अगदी लहान मुलांना शुगर बी.पी. सारखे आजार होत आहेत लोकांची मानसिकता बदलली शिक्षण आणि नोकरी हेच जीवनाचे ध्येय बनले .झट मंगनी पट शादी"
फक्त बौध्दिक ज्ञान मिळवणे एवढाच हेतु .त्यामुळेमुले पुस्तकातला किडा अशी अवस्था झाली .
खेळामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो संघटन चातुर्य येते निर्णयक्षमता विकसित होते यश-अपयश पचविण्याची ताकद येते त्यामुळे मुले स्थितप्रज्ञ होतात
उत्तम आरोग्याची फळे देणारा खेळ हा अमृतवेल आहे. खेळ आणि विनोद मानसिक थकवा दुर करुन उत्साह देणारे टाँनिक आहे, खेळा  मुळे क्रिडासंस्कृतीची निर्मिती होते , तसेच अव्वल दर्जाच्या  क्रिडापटुला नोकरीमध्ये आरक्षण मिळते.शेवटी एवढे सांगावेसे वाटते ग्रामिण भागातील डोंगरद-यात चपळ असणारी मुले आईवडीलांच्या दारिद्रयामुळे सकस आहार ,मार्गदर्शनाचा अभाव यामुळे मागे राहतात ...शासनाने शिक्षकामार्फत अशा मुलांचा शोध घेऊन त्यानां सर्व मोफत सुविधा दिल्या पाहिजेत.कागदावर नियोजन नको.तरच आपल्या देशात जागतीक किर्तीचे खेळाडू तयार होतील यात शंका नाही.
***********************स्पर्धेसाठी
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~

[8/21, 5:23 PM] 
शालेय अभ्यासक्रमात  खेळाचे महत्त्व .👯🏃

एक नाही दोन नाही बेरीज वजाबाकी नाही. तीन नाही चार नाही भूमिती ची सजा नाही. दिवस उद्याचा सवडीचा .रविवार माझ्या आवडीचा .
या गाण्याप्रमाणे तमाम मुलांना रविवार हा आवडीचा वाटतो कारण या दिवशी मुलांना खेळायला वेळ मिळतो .म्हणजे मुलांना खेळायला नक्कीच आवडते .पण आजच्या काळातील पालक मुलांना रविवारी सुद्धा विविध क्लास ,ट्युशन यात इतके गुंतवून टाकतात की त्याना खेळायला वेळ मिळतच नाही .खरे म्हणजे मुलांना मैदानी खेळ खेळू दिले पाहिजेत .त्यामुळे त्यांच्यातील उत्साह वाढून मानसिक ताण कमी होतो ,खेळा मुळे शरीर बळकट होते , मुलांना हार जीत पचवण्याची सवय लागते ,सहकार्य व्रुत्ती ,खिलाडूपणा व्यवहारी द्न्यान हे गुण मुले  नकळत शिकत असतात .शालेय वेळापत्रकात शा .शिक्षणा साठी काही तासिका ठेवलेल्या आहेत पण त्यामध्ये प्रशि क्षित    शिक्षक नसल्यामुळे खेळ गौण होतो यात ग्रामीण भागात अजुनही 7वी पर्यंतचे मुले सुट्टीत तरी शास्त्रशुध्द नाही तरी स्वच्छंद खेळताना दिसतात .पण शहरी भागात अवस्था वेगळीच दिसते .शहरी विद्यार्थी हा "रेसचा  घोडा "असल्याप्रमाणे घड्याळाच्या काट्यांसारखा धावताना दिसतो .त्याचाच परीणाम म्हणजे अगदी लहान   
वयातील मुलांना बी .पी ,शुगर ,थाय्रोइड ,ओबीसिटी ई .आजार झालेले पहायला मिळतात .मुलांच्या शारीरिक प्रगतीतील सर्वात मोठा अडसर म्हणजे टि .व्ही आणि मोबाईल आहे .ह्या दोन शत्रूमुळे मुलांचा खेळण्याचा आनंदच निघून गेला आहे .मधे पंतप्रधान मोदीजीनी  विचारले की किती मुलांना खेळून खेळून घाम येतो ?त्याचे उत्तर नक्कीच नकारा र्थी  असेल .मध्यंतरी पाच दिवसांचा आठवडा होणार असे सुरु होते तेव्हा मला खूप आनंद झाला कारण मुलांना 2दिवस खेळायला मिळेल आणि  आपल्या सारखे जे शिक्षक पालक  आहेत त्यानाही आपल्या मुलांना वेळ देता येईल.मी तरी माझ्या मुलाला रविवारी पूर्ण दिवस खेळण्यासाठी देतेच .रविवारी तो फक्त जेवणापुरता घरी येतो आणि जाम खुश असतो .खूप खेळतो .पण सर्व पालकांनी आपल्या मुलांना हा आनंद घेऊ द्यावा .माझ्या घरी केबल ,डिश नाही .त्यामुळे टि. व्ही कुणीच बघत नाही .तो वेळ खेळात घालवतात .पण मी जेव्हा बाहेर टि .व्ही .ला चिकटून बसलेली मुले पाहते ,तेव्हा खूप वाईट वाटते .त्या मुलांचे जेवण, नाश्ता  सर्व टि .व्ही  समोरच असते .त्यांच्या सोबत सम्पूर्ण कुटुम्ब टि .व्ही त रंगलेले असते ,पण सर्व सुजाण पालकांनी टि व्ही .चे फॅड जरा कमी करून मुलांना खेळण्यास प्रव्रुत्त केले तर सर्व मुले निरोगी होतील आणि आपला देश खेळामध्ये नक्कीच पुढे जाईल .मला आठवते आमच्या लहानपणी आम्ही खूप मैदानी खेळ खेळायचो.खेळ सम्पला  की सगळे मिळून कुणाच्या तरी घरी अंगत पंगत असे प्रत्येकाला एक एक घास द्यायचा त्यामुळे एकमेकांना वाटून खाण्याची सवय लागायची .आता मात्र देणे घेणे सोडा पण आपण टि व्ही समोर बसून जेवताना कुणी  
आले आहे किंवा ताटातील जेवण सम्पले आहे .हे देखील लक्षात येत नाही .असो .एकंदरीत शालेय जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे .तेव्हा मुलानो -पुस्तक नंतर वाचा ....
आता खेळा नाचा......
खेळा नाचा.........

कविता बडवे 
70@बीड 
8275942282
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~


[8/21, 5:53 PM] ‪+91 75880 55882‬: 🌹साहित्य दरबार🌹
शालेय अभ्यासक्रमात 
खेळाचे महत्त्व 🇮🇳
***********************
स्नेहलता कुलथे 
**************                 
शेजारच्या घरातून आवाज आला,अरे चिंटू,कुठे गेला असेल?पोर घरात बसेल तर नशीब ,
सारखा बाहेर पळतो.अहो ऐकलं का?,नवीन कार्टून पॅक टाका बरं,चिंटू घरात बसतच नाही.संवाद ऐकला मी तर अवाक् झाले.लहान मुलांनी कायम एका जागी बसावे ,जास्तीची हालचाल करु नये,असे प्रत्येक आईला वाटते सारखा टिव्ही पाहिला तरी चालते किवा शाळेत देखील" हाताची घडी तोंडावर बोट ठेवा ",मगच मी तुम्हाला खेळायला सोडणार नसता नाही.असे देखील बरेचदा मुलांना म्हटले जाते.
         परंतु खरेच काहो,मुलानी त्यांच्या हातापायाची हालचाल केली नाहीतर त्यानी खाल्लेल्या अन्नाचेपचन होईल का?मुले सुदृढ होतील का?एका जागी बसुन काय होईल ?अनेक प्रश्न उद्भवतात.उलट लहानपणापासून 
घरात ,शाळेत मुलांना खेळण्याची सवय लावली पाहिजे. मुलानी खूप खेळावे म्हणजेच त्याच्या शारीरिक वाढीसाठी त्याचा उपयोग होईल.आपण म्हणत असतो,मुलगा खूप छान गेम खेळतो परंतु "नेटखर्च करण्यापेक्षा त्याला नेटाने खेळु द्या ",म्हणजे शरीर ,सुदृढ व मेंदू सतेज राहील व मुले सतेज व निरोगी राहतील.
     विद्यार्थ्यांना मैदानावर खेळवणे आपले कर्तव्य आहे.तसे पाहिले तर विद्यार्थ्यांना खेळण्याची खूप आवड असते.शिकवताना जर आपण चलायचे का?कबड्डी खेळायला ...शून्य मिनिटात पुस्तक बंद ..चला ना मॅडम....खेळायला. .लेकराना खूप आवड असते.परंतु शालेय अभ्यासक्रमात अजून देखील खेळाचे वेगळे असे तास मात्र उपलब्ध झाले नाहीत .अंशकालीन शिक्षक आले होते तेव्हा थोड्याप्रमाणात हौस झाली तशी पण गरज मिटली नाही.आमच्या शाळेतील एक विद्यार्थी जालन्याला मामाकडे शिकायला गेला व दोन महिन्याने परत शाळेत भेटायला आला व म्हणाला,मॅडम,माझा नेमबाजीत प्रथम क्रंमाक आला.मला आश्चर्य वाटले आणि आपल्या दुबळेपणाची कीव आली.मी किट्टी आडगावला राहिलो असतो तर माझा नंबर आला असता का?मॅडम आणि हो,अजून आपण खूप लांब आहोत याची जाणीव झाली.
       आपण लंगडी ,कबड्डी खेळ घेतो आपण स्वतः प्रशिक्षीत नसतो व त्यामुळे खेळाचे विशेष मार्गदर्शन करु शकत नाही.आज आमच्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षकाची खूप गरज आहे.मुलांना खेळण्यासाठी जर आपण उत्तेजन दिले तर चांगल्या प्रतीचे खेळाडू आपण निर्माण करु शकतो.
      आज जागतिक पातळीवर सचिन तेंडुलकरचे नाव लोकप्रिय आहे परंतु आचरेकरासारखे आदर्श प्रशिक्षक त्याला लाभले.अर्जुन मोठा धनुर्धर झाला परंतु उतम प्रशिक्षक द्रोणाचार्य भेटले.विद्यार्थी हुशार असुन चालत नाही तर त्याला घडवणारा शिक्षक देखील प्रशिक्षीत पाहिजे.
        मग सांगा मित्रांनो, मुलानी मैदानावर मारामारी केली,लहान लहान पत्ते करुन खेळले,खेळत खेळत मारामारी केली,विद्यार्थी मोबाईलवर खेळले.या सर्व गोष्टी  आम्हाला विचार करायला भाग पाडतात.
         प्रशिक्षीत शिक्षकानी त्याना खेळाचे मार्गदर्शन केले.जगाच्या पातळीवर खेळाला किती महत्व आहे?याचे धडे शाळेमधुन दिले तर निश्चितच मुलांना त्याचे बाळकडु मिळेल.व विद्यार्थी ज्ञानप्राप्ती बरोबर क्रीडाप्राप्तीकडे लक्ष देइल.आपण खेळात सहभाग घेतला तर आपल्या गुणामध्ये देखील वाढ होऊ शकते.याचे मार्गदर्शन मिळु शकते.शासनाने देखील जि.प.च्या शाळेमधुन क्रिडाशिक्षकाची पदे भरली पाहिजेत जेणेकरून करुन विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच खेळाची माहिती मिळेल पर्यायाने विद्यार्थी चपळ व चिवट तयार होतील.
        आज रिओ ऑलिंपिक मध्ये भारताला सर्वात कमी पदके मिळाली आहेत.कारण काम करण्याची चिकाटी अजुनही आमच्याकडे कमीच पडते.आम्ही अजुनही out putदेत नाही गुण मिळणार असतील तल अभ्यास करतो.आणि हो म्हणुनच खेळांची गुणवत्ता विद्यार्थ्यांच्याअंगी बाणवायची असेल तर अभ्यासक्रमात ,शाळेत खेळाचे प्रशिक्षीत शिक्षकनेमुन विद्यार्थ्यांना खेळाचे धडे देणे अत्यंत गरजेचे आहे.तेव्हा शाळेशाळेमधुन खेळाडु तयार होतील व भारताचे नाव जगाच्या पातळीवर सर्वांच्या नजरेस पडेल.
         भारतदेश हा खेड्यानी बनलेला आहे.सध्या मात्र मोठ्या शहरामध्ये पालक स्वतः पाल्यानकडे लक्ष देत आहेत व खाजगी प्रशिक्षकाकडुन स्वत:च्या पाल्याला शिक्षण देत आहेत.मोठमोठ्या खेळात प्राविण्य मिळवत आहेत.
       परंतु 'खेड्याकडे चला'हे गांधीजीचे बोल आज पुन्हा आठवण्याची गरज वाटु लागली आहे.खेड्यातील विद्यार्थी जो खरोखर प्रामाणिक आहे जिद्दी आहे.शाळेतुन मिळणा-या वही,पाठ्यपुस्तके ,मिळणा-या शालेय पोषण आहारावर उदरनिर्वाह करणारा विद्यार्थी अतिशय परिस्थितीच्या चक्रा अडकलेला आहे.याच शाळेतून खेळ जगताचे ज्ञान, प्रशिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे.तोच खेळ जगतात भारताची धुरा सामर्थ्यपणे पेलणार आहे.
"सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जे करील तयाचे,परंतु 
प्रशिक्षीत प्रशिक्षकाचे
अधिष्ठान पाहिजे "🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🕊🕊🕊🌹🕊🌹
स्नेहलता कुलथे 
मोबा 7588055882
क्र.37🌹
~~~~~~~~*************~~~~~~~~~~

[8/21, 6:03 PM] 
📕 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला भाग १८📕
⚽🏀🏈⚾🎾🏐🏉
🎯 *शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*🏆
🏌⛷🏂🏹🚣🏊
   *अभ्यास कर*.....मग,खेळायला सोडतो....या वाक्याच्या दवाबखाली भारत आजवर हजारो ऑलिम्पिक पदकाना मुकलेला आहे, 
*चमक रही है बेटिंया, बन माथे का बिंदू,बढा रहा सन्मान देश का...साक्षी और सिंधू*.....
खरंच सध्या रिओ ऑलिम्पिक मधील साक्षी आणि सिंधु च्या यशाने सर्वजण भारावून गेले आहेत,काही क्षण का होईना,पण सगळ्यांच्या मनात अचानक खेळाचे वारे वाहू लागले.आज शिक्षक आणि त्या अगोदर एक खेळाडू म्हणून नेहमीच माझ्या दृष्टीने खेळाला महत्व आहे.आज या पेश्यातील माझे पदार्पण हे खेळामुळेच झाले, ते माझ्या अतिशय जिद्दी आणि महत्वाकांक्षी क्रीडाशिक्षकांमुळेच. नसानसांत खेळ भिणवला गेला आहे,आज हि मैदानात उतरल्यावर पाय खेळायला धावतात.शालेय जीवनात खेळ किती महत्वाचा आहे,हे मी स्वता:हून अनुभवले आहे.मैदानावरील तो सराव, स्पर्धांमधील ती चुरस खरंच आपला भावनिक,मानसिक आणि शारीरिक विकास घडवून आणते.संघटन,खिलाडूवृत्ती हि त्या काळातच नकळत आपल्यामध्ये रुजते.
सध्याच्या संगणकाच्या युगात हे मैदानीखेळ आता मागे पडत आहेत याची प्रकर्षाने जाणीव होतेय,मुलांनी कसं मनसोक्त खेळावं,सर्व एनर्जी हि त्या मैदानातच खर्ची करावी,म्हणजेच मनमुरादपणे मुले अभ्यासाकडे वळतील.शाळेतील आठवड्याच्या दोन तासिका ह्या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अपुऱ्याच आहेत.बरं त्यापेक्षा *मुलांच्या क्षमतेनुसार*,त्यांच्या खेळातील उत्तम कामगिरीसाठी  *योग्य खेळाची* निवड हि देखील तेवढीच महत्वाची आहे,.त्या-त्या भौगोलिक परिस्थितीला अनुकूल अशा खेळाची निवड करणे,आणि त्याला अनुसरून पोषक वातावरणाची निर्मिती करणे ,ही तेथील   क्रीडाशिक्षकाची खरी कसोटी आहे,मुलांना खेळाचे *बाळकडू* हे त्यांच्या *शालेयजीवनातच*दिले गेले पाहिजे.एकाग्रता,निर्णयक्षमता हि त्या वयातच खेळातून बहरू लागते.आपला विद्यार्थी हा कोणत्या खेळात पुढे जाईल,हे चाणाक्षपणे शिक्षकांनी हेरले पाहिजे.कारण या देशाला श्री.गोपीचंद सारख्या गुरूंची नितांत गरज आहे.त्यांचा त्यांच्या शिष्यावर असलेला विश्वास व त्याच्या यशासाठी स्वतःवर लावलेले निर्बंध हेही तितकेच  वाखाणण्यासारखे आहेत,आणि तरंच नवे दर्जेदार खेळाडू भावी पिढीतून तयार होतील.
शेवटी एवढंच म्हणेन,कि एक सुदृढ,संयमी,सर्वगुण संपन्न विद्यार्थी,भविष्यातील सुजाण नागरिक जर आपल्याला घडवायचा असेल तर ,त्याला मोकळ्या मैदानावर लोळू दे,मनसोक्त हुंदडू दे,पोटभर खेळू दे.तरंच *भविष्यात ऑलिम्पिक मध्येच काय,तर जगाच्या प्रत्येक स्पर्धेत आपला  विद्यार्थी,खेळाडू हा *अव्वल स्थानावर* असेल आणि तोही *मानसिक ,भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या *निरोगी* आणि *सक्षम*!!!!
     श्रीमती सुनिता संदिप महाडीक, 

मोबाइल क्रं 9029317787 
मुंबई,कांदिवली

~~~~~~~~*************~~~~~~~~~~
[8/21, 6:05 PM] ‪+91 98603 14260‬
 शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व
 स्पर्धेसाठी
***********************
सध्या आँलिम्पिकचे वारे समाजात आहे आपल्या खेळाडूंनाही त्यात यश मिळाले आहे 
आमची पिढी शाळेत शिकत असताना शारिरिक शिक्षणाचा वेगळा तास असायचा .व्यायाम मैदानी खेळ,याला महात्व होते सूर्र्यनमस्कारांनी दिवास सुरु होई 
आताच्या पिढीला ३वर्षापासूनच शाळेत घातले जाते
वाघिणीच्या दुधाला महत्व आल्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या घातले जाते मुलांवर अभ्यासाचा ताण पाठीवरच्या दफ्तराचे ओझे
वाढलेय ट्यूशन ,हाँबी क्लासेस यातून वेळ मिळाला तर टीव्हीचा इडियट बाँक्स मोबाईलवरचे गेम्स पोकेमन इ,आंतरजालावरील खेळ यामुळे मुलं मैदानी खेळ विसरलीयत.
 आईबाबा नोकरी करणारे त्यामुळे घरशाळा पाळणाघर यांत मुलांचे बालापण हरवून गेलेय 
फ्लँट सिस्टिम बंगले संस्कृती यात एकमेकांशी शेजा-याशी संवादही होत नाही कधी कधी.
माणसाचे जीवन घड्याळाच्या काट्याला बांधले गेलेय.लंगडी हुतूतू कब्बडी खोखो लगोरी हे खेळ विसरुन गेलेता सारे ,
शाळेपासून हे खेळ नव्याने पुनरुज्जिवित झाले पाहिजेत .
पालकांनीही वेळत वेळ काढून मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना मैदानावर पाठविले पाहिजे
 मैदानी खेळांमुळे प्रतिकार शक्ती वाढते आरोग्य चांगले लाभते,गांवपातळीवर शालेय पातळीवर जिल्हा आणि राज्यपातळीवरमुलाःना खेळाचे महत्व पटवून देऊन स्पर्धा घेऊन हार जीत काही असो खेळले पाहिजे ही जाणीव करुन देऊन तसे प्रयत्न झाले पाहिजेत आपले खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळाली पाहिजे.
खेळाचे महात्व पटवून दिले पाहिजे.
प्राची देशपांडे 
 समूह क्र,१५
~~~~~~~~*************~~~~~~~~~~

[8/21, 6:06 PM] ‪+91 86980 67566‬
स्पर्धेसाठी
*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*

पी टी चे सर : "सांग गण्या ,  रियो ओलम्पिक मधे  भारताले मेडल काउन नाही भेटलं....?"
गण्या : "गुर्जी , मेडल कसं भेट्न...?
तुमी आमाले  पीटी मंधी निसते  कागदंच येचाले लावता अन् गवत उपटाले लावता................!!!"
 वरील विनोद नुकताच व्हॅट्स अॅपवर वाचायला मिळाला. विनोदाचा भाग सोडला तर खूप कांही सांगून जातो हा विनोद आणि वास्तव सांगतो आहे हा विनोद. शाळेत फूलणारी मुलं शाळेचं जसं वैभव आहे तसंच ते देशाचं भाग्य आहे. पण या खेळकर वयात शरीरात साठलेली उर्जा बाहेर पडण्याऐवजी गुणवतेच्या नावाखाली तीचे दमण होताना दिसते आहे. पुन्हा रोष गुरुजींवरच आणि दोषही गुरुजींनाच दिला जातो. पण पालकांच्या अवास्तव आपेक्षांचे ओझे पेलत पेलत दमछाक
करत पुढे निघालेला विधार्थी, खेळ, क्रिडा बाबत उदासिन झालेला दिसतो आहे.गुरुजी पण गुणवत्तेच्या ध्यासाने पछाडलेले आहेत. शासन आणि पालक यांना वही पुस्तकातील गुणवत्ता हवी असते.क्रिडांगणावरील गुणवता नंतरची बाब असते. अशा परिस्थितीत पीटीचा तास केवळ वेळापत्रकातील रकान्यात शोभून दिसतो. आणि प्रसन्न बागेतील ही फुलं कोमेजून जाऊ लागली.
सव्वाशे कोटी लोकसंख्याच्या देशात ऑलंपिक पदक तालीका बघताना लाज वाटावी अशी परिस्थिती असताना ज्या देशात ऐवढी लोकसंख्या असूनही स्त्री सन्मान जपला जात नाही. निर्भयाची इज्जत वाचवू शकलो नाही, त्याच देशातील साक्षी मालिक आणि पी.व्ही. सिंधू या दोन महिलांनी देशाची इज्जत वाचवली.
पण हा प्रसंग सांगण्याचा हेतू येवढाच की आमचे अभ्यासक्रम हे ज्यांचे सरकार येईल त्यांच्या विचारानी तयार होतात. नवा शिक्षणमंत्री नवी धोरणे राबवतो.निशब हे की तीन तीन महिन्याला मंत्री बदलत नाही. खेडोपाडयात शाळांची अवस्था पाहिली तर पुरेसे मैदान नाही. प्रशिक्षक असा शिक्षक वर्ग मुलांना प्राप्त होत नाही.आडातच नसेल तर पोवऱ्यात कोठून येणार...?गावोगावी शाळेच्या जवळ असणाऱ्या तालमी आज पाहिला मिळत नाहीत. कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यांच्या तासिका अभ्यासक्रमात असतात पण प्रत्यक्षात त्याकडे धड गुरुजीचे लक्ष असते ना प्रशासनाचे शिवाय
याचे फारशा गांभिर्याने मूल्यमापनही होत नाही.
कांही कांही वेळा मूलं मैदानावर तर सर किंवा गुरुजी अन्यत्र व्यस्त असे चित्र दिसते. सव्वाशे कोटीचा देश कोणत्याही खेळात नैपुण्य दाखवू शकत नाही. ही केवळ क्लेषदायीच नव्हे तर आत्मपरिक्षण करण्याजोगे आहे. क्रिडा किंवा खेळाचा विषय अशाच प्रसंगी मोठ्या चवीने चाबलाला जातो. जेव्हा अॅालंपिक किंवा अन्य स्पर्धा असतात. शालेय सारावरून या कामी कांही बद्दल वा हालचाल व्हावी यासाठी कोणी झटताना दिसत नाही. चार भिंतीत डांबून दिलं जाणारं शिक्षण किती बौद्धीकता वाढवते, स्वच्छंदपणे, आनंदाने आणि मुक्तपणे हसत खेळत शिक्षण दिले तर पदक तालीकेकडे डोळेला लाऊन बसण्याची वेळ येणार नाही. सदृढ शरीर बनविण्याची प्रत्येक शाळा ही केंद्र बनली पाहिजे. गुणवत्तेच्या नावाखाली भोंगळ आणि कुचकामी पिढी बनवीत आपण एकविसाव्या शतकापर्यंत पोहचलो खरे पण काय दिले काय कले हा हिशोब जुळवला तर बाकी काय राहिल याचाही विचार व्हावा. शरीर कसदार बनवण्याच्या वयातच पुस्तकांच्या झापडया बांधून मुलांना बालपण कोमेजण्याच्या स्थितीत नेवून ठेवतो. शालेय अभ्यासक्रमात क्रिडेचं महत्त्व जाणून आणि ओळखून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे.
           
                     श्री. हणमंत पडवळ
        मु.पो. उपळे ( मा.)
ता. जि. उस्मानाबाद.
                        48.
~~~~~~~~*************~~~~~~~~~~

[8/21, 6:31 PM] ‪+91 94207 84086‬: स्पर्धेसाठी

⚽🏀🏈⚾🎾🏐🏉🎱⛳🏌🏓🏸🏑🏒🏹🏂⛷🏏🎿🚣🏊🏄🏻🏋🏻🚴🏽⛹🏻🏅🎖🏇🏆🏆🏆🏆

नमस्कार!!!
मी ही चित्र मुद्दामहून घेतलीत कारण आपल्यापैकी बर्याच जणांना वरील चेंडूपैकी काही चेंडूची नावेही माहीत नाहियेत आणि  विविध खेळांची नियमावली सुध्दा! 
खरंच आपल्याकडे खेळाच्या दृष्टीने पाहीले तर शालेय जीवनात म्हणावे तसे महत्व दिले गेले नाही.उगाच एखादा तास तोही मुलांच्या मनावर खेळला जातो.रोजच्या रोज नियमीत खेळ घेवून त्या विद्यार्थ्यांमधले कौशल्य वाढीस लागले पाहिजे, त्यांना बालपणापासूनच खेळाचे महत्त्व पटले पाहिजे. रोज सरावामुळे त्यांच्यातील निपुणता वाढीस लागेल.रोज घाम गाळेपर्यंत खेळल्यामुळे भूक वाढते शरीर तंदुरूस्त व निरोगी बनते.आत्मविश्वास निर्माण होतो.पण हे सारं आमच्या अभ्यासक्रमात नाहीचय नुसता शाळेचा धाक वशिस्त दाखवण्यासाठी क्रिडा शिक्षकाची नेमणूक !!
या ठिकाणी मला एक संस्कृत श्लोक आठवला त्याची प्रचिती आज येते आहे इतक्या वर्षानी..
"आसाक्षी सिंधूपर्यंता यस्य भारत भुमिका |
सर्वे भवन्तु अत्र गौरवान्वित कन्यकाः|"
अर्थ -साक्षीपासून ते सिंधूपर्यंत म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतची
जी भारतभूमी आहे तेथील सर्व मुली गौरवान्वित होवोत.
 आपल्या संस्कृत भाषेची ताकत पहा इतका जुना श्लोक आता लागू  तंतोतंत लागू पडतोय.
    तरीही अजूनही ग्रामीण भाग मागासलेलाच आहे.कारणं सांगून जमणार नाही उपाययोजना राबवल्या गेल्या पाहीजेत.
 आता माझ्याच मुलाचे उदाहरण देते.त्याला टेबलटेनिसची प्रचंड आवड.त्याचे पप्पा त्यातील चॅम्पीयनच म्हणा.त्याला आम्ही बाहेरून कोच ( प्रशिक्षक) लावला.पण शाळेतून काहीही प्रतिसाद नाही.शाळेतून प्रॅक्टीस घ्या म्हटले तर म्हणे तुमच्या तुम्हालाच करावे लागेल.
कारण हे शाळेत कंपलसरी नाही म्हणे.मग आम्ही घरीच टेबल खरेदी करून सराव केला आणि राज्यस्तरीय पर्यंत त्याने मजल मारली.आता बघा नाव कोणाचे झाले शाळेचेच ना !
     परवा माझ्या वाचण्यात एक विनोद आला पण तो विनोद मनाला चटका लावून गेला तो असा शिक्षक विचारतात- गण्या, मला सांग ,भारताला का बरं आॅलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळाले नाही ?तर गण्या म्हणतो कसं काय मिळंण सर पी.टी.च्या तासाला तुम्ही आमाला मैदान साफ करायला लावू राह्यले.
     वरील विनोदात आत्मपरीक्षणाची गरज मला भासते.निपुण क्रिडा शिक्षक
काळाची नितांत गरज आहे.प्रत्येक खेळाची माहिती शाळेतून दिली गेली पाहिजे. ग्रामीण भागात ठराविक खेळापलीकडे दुसरे काहीच माहित नाही ही शोकांतिका आहे.
हे चित्र पालटायचे असेल भारताला ऑलिंपिकमध्ये सर्वच खेळामध्ये सुवर्णपदक मिळवायचे असेल तर शालेय अभ्यासक्रमात क्रिडा शिक्षणाचा समावेश करण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.तरंच सोन्याचा पदकाचा पूर येईल.असे मला वाटते.साक्षी सिंधुचा अभिमान वाटतो.
🏆भारतमाता की जय🏆
🎖🏅भारतमाता की जय🏅🎖
    श्रीमती माळेवाडीकर रोहिणी ,
36,माजलगाव.
~~~~~~~~*************~~~~~~~~~~
[8/21, 6:36 PM
~साहित्य दरबार~
~~~~~~~~~~~~~~~~
_शालेय आभ्यासक्रमात खेळाचे महत्व_

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

*खेलोगे कुदोगे तो होगे खराब*
*पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब*

अशी म्हण मी नेहमीच एकत आले.कारण आपल्या मध्यमवर्गीय समाजात खेळास फारसे महत्व दिले जात नाही. पहिले स्थान शिक्षण नंतर खेळ हा आपला मध्यमवर्गियांचा पक्का केलेला समज.शाळेच्या क्रीडा स्पर्धेत पहिला नंबर आल्यास आपण कोणासही उठसुट सांगत बसत नाही परंतु कुठे मेडिकल,इजिंनिअरिंग लागला तर मात्र चर्चेला जणु पेव फुटत.कारण खेळ खेळून काय कोणाच पोट भरत हा आपल्या मध्यवर्गियांचा समज.शिकूनसवरून एक गडगंज पगाराची नौकरी मिळाली की आरामात आयुष्य कटत नि साऱया आयूष्याचीच चिंता मिटते. पण कधी कोणाच्या मनासही आपल्या पाल्याला व्यावसायिक क्किडापटू बबनवण्याचा विचार साधा स्पर्शुनही जात नाही.हि उदासिनता का ?  याचा कधी विचार केलाय का आपण ? 

खरे पहता जशी मुळ खोलवर रूजली की  झाड हे कधी कमकुवत बनत नाही तसाच हा खेळाबाबतीतचा उदासिनपणा हा शालेय जिवनापासुनच दूर होऊ शकतो आपण खेळाची आवड मुलाना शालेय जीवनात रूजवायास हवी प्रथम आनंद म्हणुन त्यास खेळ खेळू द्याव व हळूहळू व स्पर्धेत त्यास उतराव आणि मग आवड निर्माण झाल्यास मुल बरोबल आरोग्याची फायदे व देशासाठी खेळून व्यावसायिक बाजूही जपली जाऊ शकते हे सर्वाच्या लक्षात येईलच आणि खेळाबाबतची उदासिनताही दूर होईल नि नक्कीच भविष्यात घराघरात खेळडू जन्माला येतील यात शंकाच नाही. 

आपण शालेय जीवनात क्रिडा प्रकाराकडे नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. शाळेत जर प्रत्येक वर्षी मुलांना वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धेत भाग घेवून त्यास जर जिल्हा,विभाग,राज्य..नि पुढे अशा पातळीवर जाणिवपुर्वक लक्ष देवून प्रोत्साहन दिल तर नक्कीच भावी भारतात आँलिम्पिक मध्ये अनेक पदके जिंकली जातील यात शंकाच नाही.परंतु शासकिय दरबारातुन मात्र याकडे फारश्या आशादयक वृत्तीन पाहिल जात नाही आणि हव्या त्या सुविधाही पुरवल्या जात नाही.शाळेत मुलांनमध्ये खुप खेळाबाबत उर्मी असते परंतु त्यात यथायोग्य साथ मिळते का ? त्या योग्य प्रशिक्षण मिळत का ? पुरक साहित्य,कोच,क्रीडागंण मिळत का ?  या न अशा अनेक प्रश्नात आपला शालेय जीवनातील क्रिडा प्रकार हा आडकला आहे.

खरे पाहता शाळेत मुल 7तास अभ्यास करून केविलवाणी होतात म्हणुन 8 वा तास खेळाचा ठेवला जातो जणेकरून मुल उत्साही व्हावी व आरोग्य सुदृढ रहाव व निरोगी बनाव.मुलांना शाळेतील खेळ हा मुलांच्या मनावर केलेला एक प्रकारचा संस्कारच म्हणावयास हवा.जेणेकरून मुल उत्साही,ताकतवान,नि खेळाडू वृत्तीची बनतील.अशाप्रकारे शालेय जीवनापासुनच जर खेळाच बाळकडू आपण मुलांस देत गेलो तर नक्कीच मुलांना स्व:ताच्या निरोगी शरिराबरोबर देशालाही त्यांच्या खेळाचा नक्कीच फायदा होईल.याचसाठी प्रत्येकानी चिकीटीन शालेय जीवनापासुनच आपल्या आवडीचा खेळप्रकार निवडून त्यात पुढे प्रगती करावयास हवी व देशाच नाव उंचावण्यात अग्रक्रमी व्हावे.

परंतु काही लोक मात्र खेळाकडे एक मनोरंजनाच साधन म्हणुन पाहत आहेत.परंतु आता मात्र सिंधू नि साक्षीच्या यशाकडे पाहून नव्या पिढीच्या नजरेत मात्रहे क्षेत्र विविध आपेक्षनी भरलेल दिसत आहे. आणि नोकरशाही मानसिकता आता बदलू पाहत असतांना दिसत आहे.क्रिडेलाही एक व्यावसायिक क्षेत्र म्हणुन निवडण्याची मानसिकता नक्कीच हि रिओ नि बदलवली आहे असे म्हणावे वाटते.नि शालेय जीवनात यापुढे नक्की उत्साहित उर्मीन पाहून जोमाने भावी खेळाडू तयार होतील ही आपेक्षा आपण नक्कीच बाळगू शकतो.

म्हणुनच प्रत्येकान शालेय जीवनापासुन खेळ खेळावीत व ती आवड जोपासावी व, सर्वानीच खेळाबाबत जागृत राहून भावी खेळाडू शाळेत तयार करावेत हीच देशाची शाळेकडून आपेक्षा राहिल! !!!!!
....................................🖊
*कल्पना जगदाळे@8★बीड*

      _👆🏽स्पर्धेसाठी👆🏽_

👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿
~~~~~~~~*************~~~~~~~~~~


[8/21, 6:37 PM] ‪+91 94207 84086‬: 
साहित्य दरबार स्पर्धेसाठी

शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्त्व -

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे.आणि ह्या दोन्ही दृष्टीने सक्षम असणाराच जिवघेण्या स्पर्धेत टिकून राहू शकतो.
        प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक अवस्थेची जडणघडण मुख्यतःबालपणी होत असते आणि शालेय जीवन हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.शाळेमध्ये विद्यार्थ्यांची मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम असेल तरपुढील आयुष्यात तो किंवा ती कूठेच कमी पडणार नाही आणि यासाठी शालेय स्तरावर खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
         भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात शालेय जीवनात खेळाला फारसे महत्व दिले गेले नाही.शालेय स्तरांवर दोन-तीन प्रकारचे खेळ वगळता इतर खेळाबाबत विद्यार्थी अनभिज्ञ राहतो आणि पालकही उदासिन असतात किंबहुना खेळप्रकाराकडे दुर्लक्ष करतात.शासनाचे क्रीडा धोरण कुचकामी आहे,शाळा व्यवस्थापनाला व क्रीडा शिक्षकाला त्यात फारसे स्वारस्य नाही त्यामुळे शालेय स्तरावर विद्यार्थी खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाही.
       बॅडमिंटनसारख्या खेळात प्राविण्य मिळवायचे असल्यास तीन वर्षापासूनच सुरूवात करावी लागते अथक परीश्रम घ्यावे लागतात प्रशिक्षक नेमावा लागतो तर कुठे पुढे विविध टप्प्यांवर काही प्रगती दिसून येते.परंतु शालेय स्तरावरची असलेली शिक्षक,पालक आणि सरकारचे उदासिन धोरण जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण आंतरराष्ट्रीय स्तरांवर काहीही भव्यदिव्य यश मिळवू शकत नाहीत.
      यासाठी सरकारने क्रीडा प्रशाला,क्रीडा विद्यापीठे स्थापन करायला हवीत.ग्रामीण भागातले एकलव्य शोधायला हवेत,आणि अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार क्रीडा प्रकारात समाविष्ट करून भविष्यातील सिंधू, सायना ,साक्षी तयार करायला हव्यात.शालेय स्तरांवर जोपर्यंत खेळाला महत्त्व दिले जात नाही,शासनाचे शालेय क्रीडा धोरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदकांचा दुष्काळ संपणार नाही....

अॅड.अमोल देशमुख, 
क्र.57,माजलगाव.
~~~~~~~~*************~~~~~~~~~~
[8/21, 6:48 PM] ‪+91 95529 80089‬
शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व
"आरोग्य हिच संपत्ती " कारण पैसा गमावला तर परत मिळविता येतो परंतु आरोग्याची गाडी रुळावरुन घसरली तर सुृृदृढतेचे लक्ष्य गाठणे अशक्य आहे . सुदृढतेचा वृक्ष बहरण्यासाठी त्यांची मुळे शालेय जीवनात आणि शालेय अभ्यासक्रमात शारिरीक शिक्षणाचा अर्थात खेळाचा समावेश करुन त्याची मुळे घट्ट रोवली गेली पाहीजे.त्यामुळे अभ्यासासोबत खेळाची गोडी निर्माण होते. 
विद्यार्थ्याच्या शारिरीक, मानसिक ,भावनिक , सामाजिक म्हणजेच सर्वांगिण विकास होण्यासाठी खेळ महत्वाची भुमिका बजावत असते.विद्यार्थ्यांना खेळासोबतच त्या खेळाचे बेसिक तंत्रज्ञान माहीत असणे आवश्यक आहे व हे त्याला या ठिकाणी अवगत होते ,मग तो शालेय स्तरावरुन तालुकास्तरावर तेथुन जिल्हा नंतर विभाग त्या नंतर राज्य मग राष्ट्रिय शेवटी आंतरराष्ट्रिय स्तरावर पोहचुन देशाला एक ऊत्कृष्ट खेळाडु लाभतो.आणि हे केवळ शालेय अभ्यासक्रमात असलेल्या खेळामुळे शक्य होते .
आंतरराष्ट्रिय स्तरावर चमकण्यासाठी , पदके मिळविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात खेळाचा समावेश अत्यंत महत्वाचा आहे . याचा ऊपयोग फक्त पदकांसाठीच नव्हेतर भावी पिढी अधिक सुदृढ होण्यासाठी सुद्धा तितकेच आवश्यक आहे .
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
~~~~~~~~*************~~~~~~~~~~

[8/21, 7:03 P
🍃🌾🍁🌺🌻🌷🌼💐

*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*

शालेय जीवनात खेळाला अतिशय महत्वाचे स्थान आहे.खेळ म्हटला कि मुलंच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळतो  कारण मुलांच्या शारीरिक क्षमते बरोबर मुलांच्या शारिरीक गुणांचा विकास हा फक्त खेळामुळे होतो,पण पालक हे खेळाकडे फक्त मनोरंजन,व्यायाम या दृष्टिने पाहतात.परंतु खेळामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि म्हणुननच मुलांची शारीरीक क्षमता वाढताना खेळाला महत्व दिले पाहिजे.मुलाची शारीरीक,मानसिक,सामाजीक,बौध्दिक जडण घडण ही फक्त खेळामुळे च घडते  शालेय आभ्यक्रमात खेळाला खुप महत्व असले पाहिजे मुलाच्या दैनंदिन जीवनात अभ्यास,लिखान,वाचन, पाठांतर,या गोष्टिमुळे त्यांची शारीरीक क्षमतेकडे दुर्लक्ष झाले होते पण परंतु अभ्यासक्रमात त्याच पध्दतीने खेळाला महत्व दिले पाहीजे.जेणे करून खेळ खेळता खेळता मुलांध्ये अनेक गुणांचा विकास होतो त्या मध्ये संघभावना,हार पराजय याची शिकवण,नियमाचे पालन,सहकार्याची भावना,एकजुटता ईत्यादी अनेक गुणांचा विकास होतो. म्हणुन शालेय अभ्यासक्रमात खेळाला महत्व  दिले पाहिजे.  ''आज आपण पाहतो कि आपल्या देशाला आँलंपिक या जागतीक स्पर्ध्देत एक  मेडल मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागताता कारण की आपल्या शालेय अभ्यासक्रमात खेळाला दुय्यम स्थान दिले आहे परंतु पाश्चात्य देशात खेळाला शालेय अभ्यासक्रमात एक अविभाज्य घटक मानला जातो, तिथे मुलांना शाळेत फक्त त्यांच्यातील क्रिडा गुणांच्या कौशल्याला वाव मिळेल हीच शिकवण देतात. आपण हि आपल्या आभ्यासक्रमात शालेय जीवनात खेळाला महत्व दिले पाहिजे त्यासाठी आपल्याला पालकांची मानसिकता, मुलांची आवड,निवड, आणि शारीरीक महत्व या गोष्टिकडे लक्ष देवुन आपल्या देशाचे भवितव्य असणा-या मुलांच्या  शालेय जीवनात खेळाला एक महत्व देऊन त्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे ''

🍁🌺🌻🌷🌼🌹🍂🍃🌾
आवुलवार कविता मँडम 
स शि जि प प्रा शा किट्टी आडगाव 

~~~~~~~~*************~~~~~~~~~~
[8/21, 7:18 PM] ‪+91 84469 46555‬: साहित्य दरबार स्पर्धेसाठी 
*"शालेय आभ्यासक्रमात खेळाचे महत्त्व"*

     मुले ही देवाघरची फुले, अशी उक्ती आम्ही आजपर्यंत ऐकत आलो आहोत. मुलांचा निरागस भाव पाहून ही म्हण अस्तित्वात आली असावी, असे प्रथम दर्शनी दिसून येते. मुले ही फुला प्रमाणे नूसते निरागसच नसतात तर फुलाप्रमाणे शांत पराधिन असतात. कारण फुले ही देवाच्या मस्तकावर जाणार आहेत वा त्यांना उमलताच चुरगळून टाकणार, हे फुलांना माहित नसते. तसे मुलांना भविष्यातील अडथळे माहित नसतात. त्यावेळी खेळ हे मुलांना घडविण्याचे कार्य करीत असते.
         ज्यात शारीरिक कसरती सोबतच मानसिक कसरत असते व दोन्हीच्या समन्वयातून प्रयत्न करून ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करायचे, त्यास खेळ म्हणावे. या खेळातून खेळाडूचे चारित्र्य तसेच मानसिक तंदुरूस्ती देते. जर शारीरिक आणि मानसिक संतुलन बनवून ठेवणारे शिक्षण मुलांना शालेय जीवनात शैक्षणिक रूपात मिळणे, हे याठिकाणी महत्त्वाचे ठरते. मुले निरागस व कोमल असल्याने त्यांच्यावर खेळरूपाने संस्कार होणे आवश्यक आहे. त्यांच्यावर असे संस्कार झाल्यावर त्यांच्यात अनेक प्रकारचे बदल व प्रगती दिसून येतात.
        मुलांना खेळातून शरीर व मानसिक स्वाथ्याचे महत्त्व कळेल. त्यामुळे मुले नियमित खेळ खेळून आपली शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखतील व निरोगी जीवन व्यतीत करतील. खेळात प्रत्यक्ष क्षणा क्षणाला तात्काळ त्याच ठिकाणी निर्णय घेत खेळ पुढे न्यायचे असते. खेळाच्या सरावाने मुलांमध्ये निर्णय क्षमता वाढते. जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगात ते स्वतः निर्णय घेऊन त्या प्रसंगातून सहज बाहेर पडतील. जीवन जगण्याची उमेद त्यांच्यात येईल. त्याचा उपयोग त्यांना भविष्यात संसारीक व व्यावहारिक जीवन जगताना होऊन त्यांना जीवन आनंदाने व उत्साहाने जगता येईल. 
       खेळ खेळताना वैविध्यपूर्ण स्वभाव असलेल्या अनेक लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्याशी त्याचे संबंध निर्माण होतील. लोकांनी आपले वैयक्तिक व व्यावहारिक संबंध सांभाळायचे शिक्षण त्यांना शालेय जीवनातूनच मिळत जाईल. त्यातून मुलांच्या स्वभावात परिपक्वता येईल. त्याला सामाजिक प्रश्न व आपल्या कर्तव्याची जाणीव यातून होईल. हा भाग त्याचा व्यावहारिक जीवनास परिपक्वता देईल. इतरांना समजून घेण्याची पात्रता त्याच्या अंगी येईल. इतरांना समजून घेण्याची पात्रता ही खेळातील डावपेचातून शिकता येते. ही पात्रता आली म्हणजे तो समाजाभिमुख होईल. या सर्व गोष्टींची जाणीव झाल्याने ते शिस्त शिकतील. त्यांच्या अंगी एक प्रकारची नैतिक शिस्त येईल व त्या शिस्तीतून सर्व जीवनाची घडी बसेल. याच शिस्तीतून त्याचे कर्म सुरू होतील. त्यामुळे त्याचे कर्म कर्तव्य जाणून होत असल्याने रितसर व प्रामाणिक असतील. त्यामुळे शालेय आभ्यासक्रमात खेळांची महत्त्व असल्याने शालेय आभ्यासक्रमात खेळ हा विषय गरजेचा आहे.
       
              बंडोपंत कुलकर्णी सोलापूर 

              समूह क्रमांक १३
~~~~~~~~*************~~~~~~~~~~
@@@@@@......धन्यवाद.....@@@@@@
~~~~~~~~*************~~~~~~~~~~








2 comments: